रोजगाराचे भविष्य स्वयंचलीत जगात मानवी सन्मान

रोजगाराचे भविष्य स्वयंचलीत जगात मानवी सन्मान 150 150 aces
रोजगाराचे भविष्य स्वयंचलीत जगात मानवी सन्मान

डॉ.राजेश गोमाजी वालोदे
सहयोगी प्राध्यापक एम. बी. पटेल
कॉलेज साकोली जि. भंडारा

Published in March 2026
सारांश

भारत हा कृषी प्रधान देश असून तो विविध विभागात विभागला आहे. त्यात अनेक राज्य असून प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात लघु व कुटीर उद्योग चालत असतात. त्यातुनच मोठ्या प्रमाणात उद्याजकता निर्माण होत आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे व त्यात नवीननवीन तंत्रज्ञानाचा वापर हा उद्योगात केला जातो. उद्योगाच्या मार्गातूनच रोजगार उपलब्ध होत असतो. आज चे युग हे स्वयंचलीत जग आहे त्यात स्वयंचलीत जगात मानवाला रोजगाराद्वारे सन्मान प्राप्त करावयाचे आहे.
२१ वे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे शतक आहे. आजचे युग हे तांत्रिक व नवनिर्मीतीचे युग आहे अशावेळी मानवी श्रमाचे मूल्य व सन्मान रोजगाराचे माध्यमातून टिकून राहील हा एक प्रश्न आहे.
शिक्षण, आरोग्य, शेती, बांधकाम, लघुउद्योग, कुटीरउद्योग, हस्तव्यवसाय दुय्यम उद्योगज्यात पशुपालन, दुग्धपालन, मत्स्थव्यवसाय व इतर उद्यागाद्वारे रोजगाराचा समावेश केला जातो शेतीच्याद्वारे आज अनेक दुय्यम उद्योग घेतले जातात व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध घेत असतो. तसेच शहरी भागात उद्योगधंद्याच्या मार्फत रोजगार घेत असतो.